कवितेचे शीर्षक - स्वप्न सत्यात दिसेलच...
बाबासाहेबांनी दलितांनाच नव्हे
तर सर्वांनाच माणसात आणलं ,
जातीयतेच्या नि असमानतेच्या
जात्यातील दुःख त्यांनी जाणलं...
न्याय आणि समतेच्या हक्कासाठी
लेखणीतून आचार - विचार मांडलं ,
दिवस - रात्र एक करून सर्वासाठी
घामाचं थेंब - थेंब सांडलं...
अशा बाबांना ओळखायला
खरं उशीर आम्हीच हो केला ,
आता विचार घेतलाय वाचायला
समज स्वतः घालतोय मनाला....
लिहून ठेवलं बरंच त्यांनी
समजायला पडेल आयुष्य कमी ,
हिंदूंचेच देव , दलितांचेच बाबा
यातच खरं अडकलो आम्ही...
वैचारिकतेचे बोट धरत सध्या
परिवर्तनाचं पाऊल पुढं टाकतोय ,
अजूनही वेळ गेलेली नाही
म्हणून बाबांना वाचू पाहतोय...
चालतंय सगळं त्यांच्या तत्वावर
एक दिवस असा असेलच ,
अपेक्षा नाही विश्वास आहे
पाहिलेलं स्वप्न सत्यात दिसेलच...
*✍️ श्री. विपुल उत्तम आढाव✍️*
बाबासाहेबांनी दलितांनाच नव्हे
तर सर्वांनाच माणसात आणलं ,
जातीयतेच्या नि असमानतेच्या
जात्यातील दुःख त्यांनी जाणलं...
न्याय आणि समतेच्या हक्कासाठी
लेखणीतून आचार - विचार मांडलं ,
दिवस - रात्र एक करून सर्वासाठी
घामाचं थेंब - थेंब सांडलं...
अशा बाबांना ओळखायला
खरं उशीर आम्हीच हो केला ,
आता विचार घेतलाय वाचायला
समज स्वतः घालतोय मनाला....
लिहून ठेवलं बरंच त्यांनी
समजायला पडेल आयुष्य कमी ,
हिंदूंचेच देव , दलितांचेच बाबा
यातच खरं अडकलो आम्ही...
वैचारिकतेचे बोट धरत सध्या
परिवर्तनाचं पाऊल पुढं टाकतोय ,
अजूनही वेळ गेलेली नाही
म्हणून बाबांना वाचू पाहतोय...
चालतंय सगळं त्यांच्या तत्वावर
एक दिवस असा असेलच ,
अपेक्षा नाही विश्वास आहे
पाहिलेलं स्वप्न सत्यात दिसेलच...
*✍️ श्री. विपुल उत्तम आढाव✍️*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा