कवितेचे शीर्षक - बोलता - बोलता
असं वाटतं तू सोबत असल्यावर
निघून जावं असच पटकन आयुष्य ,
तू नसल्याची जाणीव होण्याआधीच
भकास वाटेल सारे माझे भविष्य
जीवनाच्या वाटेवर आपण दोघे
चालू हळू देता साथ सोबत ,
आलेल्या संकटावर आपण मात करू
जीवनी येईल कशाला , कुठली नौबत ?
खट्याळ , प्रेमळ , साधा
आपुला ठेवूया स्वभाव ,
आपलेपणाची झालर त्याला
कधी लाजरा तो भाव
तुला माझी नि माझी तुला
असावी गोडी नि भेटीस आतुर ,
जीवनी आपण गीत गावे
जुळवू संगीत सप्त सूर
भाषा विरहाची दूर व्हावी
मनी नसावी कधी आपुला द्वेष ,
मिलनाची ती तृप्तता यावी
पुसून जावी हृदयातील आंतररेष
असंच वाटतं आपण बोलता - बोलता
आयुष्यात ती संध्याकाळ यावी ,
एकमेकांचे हात हातात घेता
प्रेमाची ती सुखद बाग फुलावी
*✍️ श्री. विपुल उत्तम आढाव✍️*
असं वाटतं तू सोबत असल्यावर
निघून जावं असच पटकन आयुष्य ,
तू नसल्याची जाणीव होण्याआधीच
भकास वाटेल सारे माझे भविष्य
जीवनाच्या वाटेवर आपण दोघे
चालू हळू देता साथ सोबत ,
आलेल्या संकटावर आपण मात करू
जीवनी येईल कशाला , कुठली नौबत ?
खट्याळ , प्रेमळ , साधा
आपुला ठेवूया स्वभाव ,
आपलेपणाची झालर त्याला
कधी लाजरा तो भाव
तुला माझी नि माझी तुला
असावी गोडी नि भेटीस आतुर ,
जीवनी आपण गीत गावे
जुळवू संगीत सप्त सूर
भाषा विरहाची दूर व्हावी
मनी नसावी कधी आपुला द्वेष ,
मिलनाची ती तृप्तता यावी
पुसून जावी हृदयातील आंतररेष
असंच वाटतं आपण बोलता - बोलता
आयुष्यात ती संध्याकाळ यावी ,
एकमेकांचे हात हातात घेता
प्रेमाची ती सुखद बाग फुलावी
*✍️ श्री. विपुल उत्तम आढाव✍️*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा